“अजाब तसा चांगल्या घरचा होता. दर रविवारी त्याचा भाऊ त्याच्यासाठी एक तांब्या भरून तूप घेऊन यायचा. गावात नेऊन त्याला रवा घेऊन द्यायचा आणि अजाब रोज शिरा करून खायचा. शिवाय त्याला घरून रोज डबासुद्धा यायचा. तो आमच्याकडं पाठ करून जेवायचा. आम्हाला जेवायला रोज एकच मेनू. पिठलं आणि भाकरी. अर्थात आपल्याला शिरा खायला मिळत नाही याचं आम्हाला कधी वाईट वाटलं नाही. पण त्याची जी वृत्ती होती त्याचा आम्हाला संताप येत असे. बरं तोसुद्धा गप्प बसत नसे. येताजाता काहीतरी टोमणा मारत असे.”
गेले काही दिवस कसल्या ना कसल्या कारणाने लिहायला जमले नाही. बऱ्याच जणांनी पुढचा लेख कधी येणार अशी चौकशी केली. उशीर झाल्याबद्दल माफी.