दादांचं कॉलेज

आज संध्याकाळी दादांबरोबर गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता पोर्शे इंडियाचा डायरेक्टर पवन शेट्टीचा विषय निघाला. मी दिवसापूर्वी त्याच्याबद्दल वाचले होते. दादांना मी त्याच्या वाटचालीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजला एमबीए केल्याचं मी दादांना सांगितलं. ते ऐकून दादांनी मला थांबवलं आणि म्हणाले, “मी मध्येच तुला थांबवतोय पण हे ऐक.”
 
मी त्यांना म्हटलं बोला. दादा बोलू लागले
 
माझी अकरावी संपल्यानंतर मी मुंबईला गेलो. त्यावेळी दहावी नसायची. माझ्या डोक्यात मुंबईला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायची हा विचार होता. मुंबईमध्ये मी आपल्या गावच्या एका माणसाकडे राहायला होतो. मारुती खेबडे नाव त्याचं. फार भला माणूस होता. वेळ मिळेल तेव्हा मी त्याच्याशी बोलत असे. त्याने मला सांगितलं की तू सिडनहॅम कॉलेजला जा. मी माझी सगळी कागदपत्र घेऊन गेलो. त्यावेळेस पॅन्ट माहीतच नव्हती आम्हाला. पायजमा आणि शर्ट हाच आमचा वेष असे. त्याबद्दल लाजही वाटत नसे.  मी आपला जाऊन रांगेत उभा राहिलो. मला पायजमा आणि शर्टमध्ये पाहून आजूबाजूचे लोक आपसांत बोलू लागले. बर ते इंग्लिशमध्ये बोलत. मला कळायचं की हे आपल्याबद्दल बोलत आहेत. पण मला स्वतःला इंग्लिश बोलता येत नव्हते. मग आपला गप्प राहिलो. नंबर आल्यावर आतमध्ये गेलो. माझी कागदपत्रे टेबलावर बसलेल्या बाईच्या हातात दिली. मला ६८ टक्के होते. त्यावेळेस ते मार्क खूप असत. माझे मार्क पाहून तिने आश्चर्याने मान वर केली आणि म्हणाली, “अरे!! ६८ है तुझे. मिलेगा तुझे.” मी तिला फी विचारली. फी ३०० रुपये होती. माझ्याकडे तेव्हा कसले बोंबलायला आले ३०० रुपये. मी तिला म्हटलं मी उद्या येतो आणि बाहेर पडलो. बाहेर आल्यावर सगळ्यांनी मला गराडा घातला आणि म्हणाले, “बहोत अच्छा मार्क मिला है.” १५ मिनिटांपूर्वी जे लोक मला हसत होते तेच आता माझ्याभोवती गराडा घालून माझं कौतुक करत होते. तेव्हा मला स्वतःचाच फार अभिमान वाटला. घरी येऊन मी खेबड्याला सांगितलं की ३०० रुपये फी आहे. खेबडे तेव्हा एका ऑफिसात शिपाई होते. त्याने त्याच्यापरीने प्रयत्न करून मला ६० रुपये गोळा करून दिले. पण ते पुरेसे नव्हते. मग काय.. मी आपला थोरांदळ्याला परत आलो आणि सडकंवर कामाला जायला लागलो. त्या कामाचे जे पैसे मिळतील त्या पैशातून पुढच्या वर्षी मंचर कॉलेजला जायचं असा विचार होता डोक्यातसडकेवरच्या कामाचा अनुभव तुला परत कधीतरी सांगेल.  
 
एक दिवस रेशनची साखर आणायला रांजणीला गेलो. रांगेत माझा नंबर आला. मी पुढं होऊन रेशनवाल्याच्या हातात कार्ड दिलं. त्याचं नाव मारुती भिमाजी भोरत्याने कार्ड घेतलं आणि लांब फेकून दिलं. मला कळाना काय झालं. लोकं म्हणाली अहो त्या पोराचा नंबर आहे. द्या की त्याला साखर. तो काय ऐकेना. वर लोकांना सांगत होता की तुम्ही आपली साखर घ्या आणि चालू पडा. सगळे लोक गेल्यावर त्याने मला विचारलं. “तुझं नाव काय रे?” 
 
मी नाव सांगितलं.
 
तू आत्ता कुठं असायला पाहिजे?”
 
मी म्हटलं, “सडकंवर“. 
 
गप्प. कॉलेजला का जात नाही?”
 
मी -“पैसे नाय फी भरायला.” 
 
घरी कारभारी कोण आहे?”
 
मी – “चुलता
 
मी उद्या येणार आहे तुमच्या गावात. तिथं भेट मला.”
 
बरं म्हणून मी आपला घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी गावातल्या पारावर खेळत होतो. थोड्या वेळात मारुती भोर येताना दिसला मला. तो शाळेत गेला. पुढच्या  मिनिटांत मला गुरुजींनी बोलावलं आणि सांगितलं तुझ्या चुलत्याला बोलावून घे. मी पळत घरी आलो. दादांना सांगितलं गावात मारुती भिमाजी आलाय. त्याने तुम्हाला बोलावलंय. दादा लगेच निघाले. शाळेत आल्यावर मारुती भिमाजी त्यांना म्हणाला, “तुम्ही घरचे कारभारी का?” 
 
दादांनी होकारार्थी मान हलवली
 
हा पोरगा कॉलेजला गेला पाहिजे.”
 
हं म्हणून मी आणि दादा घरी निघालो. येताना दादांनी एक पोस्टकार्ड घेतलं. घरी येऊन ते कार्ड माझ्यासमोर टाकून म्हणाले, “लिही“. 
 
ते सांगत गेले ते मी लिहीत गेलो. दिवसांनी एक माणूस घरी आला आणि मला हाक मारली. मी जवळ गेल्यावर त्याने खिशातून शंभर रुपयांची नोट काढून मला दिली आणि म्हणाला, ” हे घे आणि काय कुठं झक मारायची ती मार.” मुंबईहून नानांनी (मुंबईचे चुलते) त्याच्याकडे ते शंभर रुपये पाठवले होते
 
ते पैसे घेऊन मी मंचर कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि माझं कॉलेज सुरू झालं. मध्ये मारुती भिमाजी गेले. मला मात्र ते कळलं नाही. नंतर कुणीतरी सांगितलं तेव्हा मात्र मला फार वाईट वाटलं. अजूनही माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा माणूस म्हणून मी त्याचा उल्लेख करतो.” 
 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.