जर भारत हरला असता तर..

काही वेळापूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना संपला. आणि कोट्यावधी भारतीयांच्या मनामध्ये असलेला विजय धोनीच्या वीरांनी खेचून आणला. सचिन नेहमीप्रमाणे त्याचा डाव खेळला. त्याचा १०० वं शतक हुकलं याची हुरहूरमात्र त्याच्या चाहत्यांना लागून राहिली. आशिष नेहराला खेळवण्याची धोनीची चाल कमालीची यशस्वी ठरली आणि नेहरासुद्धा अपेक्षांना जागला. पाकिस्तानच्या संघाने गचाळ क्षेत्ररक्षण कसं करावं याचं सुरेख प्रदर्शन केलं.

या सामन्यागोदर मिडीयावाल्यांनी किंवा दोन्ही संघांच्या चाहत्यांनी या सामन्याला अगदी युद्धाचं स्वरूप दिलं होतं. आज भारत जिंकला म्हणून ठीक आहे पण जर आपण हारलो असतो तर आत्ता जल्लोष करणाऱ्या याच चाहत्यांनी काय केलं असतं? हे युद्ध भारतीय संघ हरला म्हणून त्यांना काय शिक्षा दिली असती? आत्ता मैदानामध्ये झालेला हा जल्लोष कशामध्ये बदलला असता? पाकिस्तानी खेळाडू सुखरूपपणे हॉटेलपर्यंत गेले असते का?? त्यांना मुंबईमध्ये लोकांनी कशी वागणूक दिली असती. हा जो असंतोष असता तो अजून किती दिवस असाचं राहिला असता?? कदाचित पुढच्या विश्वचषकापर्यंत?? पुढच्या वेळेस भारत पाकिस्तानला हारवेल तोपर्यंत?? तुम्ही म्हणालं मला वेड लागलं आहे.पण स्वतःच्या मनाशी विचार करा आणि या प्रश्नांची उत्तरे काय असली असती याचा शोध घ्या..

अर्थात भारतीय संघ अंतिम फेरीमध्ये गेला याचा मलादेखील आनंदच आहे. आणि त्यांना अंतिम फेरीसाठी माझ्या शुभेच्छा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.